अमिताभ बच्चन आपल्या चीतपारीचीत अंदाज, आपला दमदार आवाजासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांच्या<br />भाषणातील प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आतुरलेले असतात. निमित्त होते बाळासाहेब ठाकरे<br />ह्यांच्या जीवनीवर आधारित “ठाकरे” हा नवीन चित्रपटाच्या टीझर रीलीझिंग कार्यक्रमचे. ह्या कार्यक्रमात<br />त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्याबद्दल एक महत्वपूर्ण घटना सांगितली. कुली चित्रपटाच्या<br />शुटींग दरम्यान एक मोठा अपघात झाला होता. मी जीवन मरणाच्या रेषेवर उभा होतो, सारा देश<br />माझ्यासाठी प्रार्थना करत होता. मी बंगलोर च्या हॉस्पिटल मध्ये अर्धशुद्ध अवस्थेत होतो. मला मुंबईला<br />हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊसामुळे कुठलीही रुग्णवाहिका मिळत नव्हती आणि माझ्यासाठी<br />शिवसेनेची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. अस झालं नसत तर माझ्यावर खरच बिकट<br />परिस्थिती ओढवली असती.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews